-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्रमाणलेखन' हा भाषेचा पायाभूत घटक असला, तरी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. नागेश अंकुश यांचा 'मागोवा : प्रमाण मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास' हा ग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. या अभ्यासपूर्ण संशोधनपर ग्रंथात ते मराठी भाषेच्या विकासाची नोंद घेताना निर्दोष लेखनाच्या चारशे वर्षांच्या जडणघडणीचा साक्षेपी आढावा घेतात. प्रमाणलेखनाचे नियम सांगून थांबण्याऐवजी ते भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे समतोल विवेचन करतात. निर्दोष लेखनपरंपरेचा उगम, प्रवास आणि तिच्यामागील भाषिक विचार यांची सुबोध मांडणी यातून दिसते. प्रमाणलेखनाला आकार देणाऱ्या विविध घटकांची समग्र ओळख करून देणाऱ्या या ग्रंथातून मराठी लेखनाच्या शिस्तबद्धतेची सहज ओळख होते. डॉ. अंकुश प्रमाणलेखनाकडे केवळ व्याकरणाच्या चौकटीतून नव्हे, तर भाषेच्या सांस्कृतिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पाहतात. त्यांच्या आधीच्या ग्रंथांतील भाषाजागृती 'मागोवा' मध्ये संशोधन आणि चिंतनाच्या रूपाने प्रकर्षाने जाणवते. विविध संस्थात्मक कार्यांची बारकाईने नोंद घेत त्यांनी प्रमाणलेखनाशी निगडित अनेक दुर्लक्षित संदर्भ उलगडले आहेत. मराठीच्या प्रमाणलेखनाचा प्रवास समजावणारा आणि भाषेच्या उत्कर्षासाठी पायाभूत ठरणारा हा ग्रंथ एक उत्तम असा संदर्भग्रंथ आणि माहितीकोश ठरतो. 'मागोवा' हा मराठी प्रमाणलेखनाचा परामर्श घेणारा मराठीतील बहुधा पहिलाच ग्रंथ असावा. प्रमाणलेखनाची जडणघडण आणि वाटचाल समजून घेण्यासाठी अभ्यासकांपासून ते भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या वाचकांपर्यंत सर्वांनाच तो अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी मला खात्री वाटते. सुधीर रसाळ
All BooksMagova | मागोवा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreरामायण-महाभारतासारख्या प्राचीन महाकाव्यांचा जो विविध दृष्टीकोनातून चिकित्सक अभ्यास होत आहे, त्यामुळे त्याकाळचे समाजजीवन, राजकीय स्थित्यंतरे, व्यक्ती-त्यांचे स्वभाव, गुणदोष, स्त्री-पुरूष संबंध इत्यादी गोष्टींबाबत नवी नवी माहिती उजेडात येत आहे. शाप आणि वर हे महाभारत ग्रंथाचे केवळ शोभनीय पैलू नसून ते अंगभूत असे अविभाज्य भाग आहेत. रामायण घडले ते दशरथाने कैकयीला दिलेल्या वरांमुळे आणि महाभारत साकारले ते देवव्रताच्या प्रतिज्ञेतून. रामायणात ६१ शाप आणि ८४ वर आहेत तर महाभारतातील शापांची संख्या १४७ असून वर २७२ आहेत. शपथा, प्रतिज्ञा, सत्यक्रिया,आशीर्वाद, आकाशवाणी यांचे प्रमाणही उपेक्षणीय नाही. ग्रंथरचनेतील या सर्वांचे स्थान आणि योजना महत्त्वपूर्ण आहे. व्यास-वाल्मिकीसारख्यांना शाप / वराची योजना करण्याची आवश्यकता का भासली असावी ? ही संकल्पना कशी उदयास आली ? शाप / वर देण्याचा अधिकार कोणाला, केव्हा आणि कसा प्राप्त होऊ शकतो ? अतिरिक्त उपयोगाने शाप / वर निष्फळ होतात काय ? कोणत्या वैशिष्टयांमुळे त्यांचा एवढया विपुल प्रमाणात उपयोग करण्यात आला ? साहित्यदृष्टया शाप / वर यांचे मूल्य काय ? हे या ग्रंथाचे अलंकार, विभ्रम की अविभाज्य अंग ? त्यांच्याविषयी समाजाला इतके जबरदस्त आकर्षण का वाटावे ? इत्यादी अनेक प्रश्न हे ग्रंथ वाचताना मनात येतील. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे.
संकीर्णMahabhartache Vardan | महाभारताचे वरदान
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartचित्तो जेथा भोयोशून्यो या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणाया या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय,सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
All BooksMahajalache Muktayan | महाजालाचे मुक्तायन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartअडीच हजार वर्षांपूर्वी या भूतलावर एक महापुरुष जन्मला. प्रज्ञा अन् परिश्रम यांच्या संगमातून त्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. अखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध' बनला. मानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी बुद्धाने चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद यांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. ज्ञान, करुणा, दया, अहिंसा, शांती यांचा संदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, ही शिकवण साऱ्या मानवजातीसाठी सांगितली. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे. राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत बुद्ध या जीवनप्रवाहाचा मागोवा घेणारे - आजच्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत; व्यक्तिगत अन् सामूहिक जीवनसंघर्षात अढळ ध्रुवासारखे मार्ग दाखवणारे चरित्र.
All BooksMahakarunik | महाकारुणिक
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartअडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी ! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. 'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक घना रणसंग्राम ! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा - महानायक ! देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटा'वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.
कादंबरीMahanayak (Sampadit Avrutti) | महानायक (संपादित आवृत्ती)
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartसतीश आळेकर लिखित- दिग्दर्शित 'महानिर्वाण' हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरले त्याला आज थोडीथोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षे झाली. स्थल-काल-संस्कृतिविशिष्ट संदर्भ असलेले हे नाटक अन्य भारतीय भाषांत अनुवादित व मंचित झाले. अन्वयार्थाच्या अनेक शक्यता व क्षमता सुचविणा-या या नाटकाने अभ्यासकांना व रंगकर्मीनाही जणू एक आव्हान दिले. 'महानिर्वाण'च्या आतापर्यंत झालेल्या समीक्षेतून व या नाटकाच्या प्रयोगाशी संबंधित असलेल्या मराठी तसेच परभाषक कलावंतांनी शब्दबद्ध केलेल्या निर्मितीच्या कहाण्यांतून याचा पुरेपूर प्रत्यय येतो. हास्याचे वेदनेत रूपान्तर करणारे हे आख्यान - महानिर्वाण अजूनही पहिल्याइतकेच साग्रसंगीत, जोषात रंगते आहे आणि आताचे तरुण प्रेक्षकही त्याला पूर्वीइतकाच तन्मयतेने प्रतिसाद देत आहेत. अजूनही मृदंगावरची थाप तेवढीच कडकडीत पडते, हार्मोनियमचे सूर स्वच्छ- स्पष्टपणे उमटतात आणि नाटकाच्या अखेरीस येणारा देह जावो अथवा राहो हा तुकारामांचा अभंग आपल्याला व्याकूळ करतो. तिकडे रंगमंचावर लाल होत जाणा-या ज्वाळांनी वेढलेले भाऊ मरत असतात आणि त्या काही क्षणांत आपण रसरसून जगत असतो. असा अनुभव देणारी नाटके बहुधा अल्पच असतात. 'महानिर्वाण' हे अशा नाटकांपैकी एक आहे. म्हणूनच 'समीक्षा आणि संस्मरणे' या दोन्ही दृष्टींनी ते लक्षणीय ठरते.
रसग्रहण / समीक्षाMahanirvan : Samiksha Aani Sansmarne | महानिर्वाण : समीक्षा आणि संस्मरणे
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartगेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक आणि संप्रदायिकेतर संशोधक-अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपद्धती आणि आधुनिक महानुभावीय व्याख्यानपद्धती या उभय पद्धतींचे सविस्तर अध्ययन- अध्यापन झालेले नाही. प्रा. बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव वाङ्मयाच्या व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन आहे. महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे. संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे आणि या परिचयातून व्याख्यानपद्धतीचेही आकलन होणे - हे दोन्ही प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत मिसळले आहेत, ती गुंफण हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन बसले आहे. डॉ. बापट यांचा ग्रंथ म्हणजे महानुभावांच्या व्याख्यानवाङ्मयाचे एक महाव्याख्यानच ! डॉ. सदानंद मोरे
All BooksMahanubhav Part 1 Ani 2 | महानुभाव वाड.मय भाग १ व भाग २
₹3,000.00Original price was: ₹3,000.00.₹2,250.00Current price is: ₹2,250.00. Save ₹750 Add to cart -
Sale! Add to cart'स्त्री-पुरुष असा भेद करत, स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करत आणि पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे, असं म्हणत साऱ्या धर्मांनी स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं. समस्त पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना समस्त स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं करून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला, एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही? त्याच्या करुणास्वरूपाला त्यामुळे लांच्छन कसं लागलं नाही? इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा हे महापुरुष माणुसकीच्या, तत्त्वज्ञानाच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करीत राहिले? स्वत:ला करुणामयी कसे म्हणवून घेत राहिले? की माणसाच्या कल्याणाचा विचार करताना स्त्री त्यांच्या हिशोबातच नव्हती? '
समाजकारण / राजकारणMahapurushachya Najaretun Stree | महापुरुषाच्या नजरेतून स्त्री
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य... व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे पुरोगामी प्रतिमा मिरवणारे. या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना. इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... महाराष्ट्रधर्म ही तिची उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली. स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली, तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या घटनेला तब्बल ५० वर्षे उलटून गेल्यानंतर कोणते चित्र दिसते आहे आणि काय दिसायला हवे, या दोन प्रश्नांच्या अनुरोधाने चिकित्सक पण विधायक दृष्टीकोनातून केलेली ही साधार चर्चा. विचारांना प्रवृत्त करणारी आणि दिशा दाखवणारीही...
इतिहासMaharashtra Eka Sankalpanecha Magova | महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart
Skip to content
