Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
इंद्रधनुषी साहित्य योजना बॅनर

Rajhans Podcasts

दुबई काल आणि आज

दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोऱ्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत. आणि म्हणूनच स्थानिक वाचक दुबईच्या भूतवर्तमानाशी समरस होतील, त्यांना ही आपलीच गोष्ट वाटेल. दुबईचे यथार्थ दर्शन घडवणारे आणि दुबई-दर्शनाची ओढ लावणारे..

एका स्थापत्य अभियंत्याची कर्तृत्वगाथा

सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांच्या काळाचे कोलाज आहे! संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य तर सिव्हिल इंजीनिअर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुशाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिहिल्यासारखी तारखांची आणि प्रमुख घटनांची नोंद नाही. तर त्यात नाट्य आहे. कुमारवयातलं प्रेम, घरच्यांचा विरोध ते स्वतःला सिद्ध करत घरच्यांच्या संमतीनं झालेला आंतरजातीय प्रेमविवाह आहे. तमिळनाडू-पश्चिम बंगालपासून ते अबूधाबी-इराक आणि नेपाळमध्ये साकारलेल्या महाकाय प्रकल्प उभारणीतलं योगदान आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, जगण्या-मरण्याचे प्रसंग आहेत, मुंबईतल्या लँडमाफियांपासून भ्रष्ट प्रशासनापर्यंत अनेक पातळ्यांवर केलेला संघर्ष आहे. पाषाणाचे पाझरमधून एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सिरीजला शोभेल अशी दीर्घ कथाच विवेक गाडगीळ स्वतःच्या जगण्यातून उलगडतात. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमधून.

अलौकिक अंटार्क्टिका | Antarctica Travel Story

निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते. त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो.

इंद्रधनुषी साहित्य योजना..सप्ततारांकित राजहंसी लेखकांची पुस्तके २५% सवलतीत !

दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान, चेंबूर यांच्या तर्फे पुरस्कार जाहीर ! सर्व लेखक - लेखिकांचे मन:पूर्वक अभिनंदन !!

बाय गं .. - विद्या पोळ - जगताप लिखित कादंबरीला स्व . दिवाकर श्रावण चौधरी , जळगाव पुरस्कार जाहीर ,