Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
इंद्रधनुषी साहित्य योजना बॅनर

Rajhans Podcasts

विश्वास पाटील यांची वास्तवदर्शी महागाथा

आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग या दीर्घ कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन सादर करताहेत अभिनेते नचिकेत देवस्थळी. तर लालबाग, परळ, गिरणगावात घडणाऱ्या या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेतील काही आठवणी सांगताहेत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉ. सदानंद बोरसे. राजहंस प्रकाशनाच्या इंद्रधनुषी साहित्य योजनेअंतर्गत विश्वास पाटील यांच्या सर्व राजहंसी कलाकृती २५ टक्के सवलतीमध्ये उपलब्ध आहेत.

..आणि वयाच्या ८९ व्या वर्षी अल्लादियाखां यांनी गाजवली संगीत मैफल | Mi Alladiyakhan

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषद ही भव्य सांगितीक मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्या अध्यक्षस्थानी होते न्यायमूर्ती जयकर. तर या मैफलीची सांगता झालेली उस्ताद अल्लादियाखां यांच्या गायनानं. वास्तविक तेव्हा अल्लादियाखां हे ८९ वर्षांचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी नम्रपणे नकार दिला होता. पण स्वतः बॅरिस्टर जयकर यांनी आग्रह केल्यानं त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं होतं. या संपूर्ण प्रसंगाचं चित्रण मी अश्विनी भिडे देशपांडे लिखित मी अल्लादियाखां या चरित्राच्या पहिल्या प्रकरणात आहे. याचं अभिवाचन केलंय अभिनेता नचिकेत देवस्थळी यांनी.

एक अनघड प्रवास उलगडणारं फकिरी | Fakiri | Datta Bargaje

खरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण, मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा. ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही, स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास.

इंद्रधनुषी साहित्य योजना माहे. सप्टेबर २०२५

दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान, चेंबूर यांच्या तर्फे पुरस्कार जाहीर ! सर्व लेखक - लेखिकांचे मन:पूर्वक अभिनंदन !!

बाय गं .. - विद्या पोळ - जगताप लिखित कादंबरीला स्व . दिवाकर श्रावण चौधरी , जळगाव पुरस्कार जाहीर ,

वाचकांच्या अंगणात नव्याने उतरलेली