Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
इंद्रधनुषी साहित्य योजना बॅनर

Rajhans Podcasts

अफगाण-रशिया युद्ध, दुर्गाबाई भागवत ते अटल बिहारी वाजपेयी | Pratibha Ranade

ज्येष्ठ संशोधक आणि व्यासंगी लेखिका प्रतिभा रानडे यांचा आज २० ऑगस्ट हा वाढदिवस. प्रतिभाताईंची ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, अफगाण डायरी काल आणि आज, फाळणी ते फाळणी, पाकिस्तान अस्मितेच्या शोधात, यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी एक आकलन, रेघोट्या, फैज अहमद फैज अशी अनेक पुस्तकं राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केली आहेत. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रतिभाताईंशी विशेष संवाद साधताहेत कवियत्री व लेखिका दीपाली दातार.

मी...अल्लादियाखां | Mi Alladiyakhan | Ashwini Bhide Deshpande

मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब...जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते. जणू ‘गायनाचे गौरीशंकर'! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी. मी अल्लादियाखां या पुस्तकाच्या लेखिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याशी संवाद साधताहेत ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम..

दौशाड: दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक | Daushad Book

दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं फुलत राहते. भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. ती सांगत असते, ‘कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही.’ तिचाच आदर्श आम्ही घेतला.

दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान, चेंबूर यांच्या तर्फे पुरस्कार जाहीर ! सर्व लेखक - लेखिकांचे मन:पूर्वक अभिनंदन !!

वाचकांच्या अंगणात नव्याने उतरलेली