समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cart'मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत ! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच जिवंत आहेत असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो ? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून उद्या साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न. गांधी उद्यासाठी '
समाजकारण / राजकारणGandhi Udyasathi | गांधी उद्यासाठी
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartएकटी राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका ! तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक - सगळयावर समाजाची बारीक नजर ! जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती समाजाला कशी कळणार ? बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे, ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ? विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.'
समाजकारण / राजकारणHe Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartइतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठ्यांच्या युद्धाची कहाणी परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी. जगातल्या चौदा देशांतला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या अन् दबलेल्या मनस्थितीच्या साक्षी अशा डाय-यांतले काही दिवस. परस्परांचे शत्रू असलेल्या देशातली मुलंसुद्धा टाहो फोडूनच एकच प्रश्न विचारतात- जगातली युद्ध संपणार काधी?
समाजकारण / राजकारणHiravlele Awaj | हिरावलेले आवाज
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे...'
समाजकारण / राजकारणJagayachihi Sakti Ahe…. | जगायचीही सक्ती आहे…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते !'
समाजकारण / राजकारणJagna Premacha Ani Maranahi | जगणं प्रेमाचं अन् मरणंही!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartजेरुसलेम... ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान या तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारं हे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सतत धुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्या स्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू-अरब संघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेत पोचला आहे. त्या संघर्षाच्या गेल्या वर्षीच्या अत्यंत निर्वाणीच्या टप्प्यावर निळू दामले हे प्रसिद्ध पत्रकार त्या युद्धभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन, तेथली स्थिती निरखून आले. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या संघर्षाचा अथपासून इतिपर्यंतचा इतिहास नाही, पण सर्वसामान्यांना तो जटिल प्रश्न समजू शकेल अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक-रंजक वृत्तांतकथन आहे. विषयाला थेट जाऊन भिडणा-या, व्यक्ती-प्रसंगांच्या नेमक्या निरीक्षणातून किस्से सांगत-गुंते उलगडवत नेणा-या विशेष शैलीत केलेले युद्धभूमीचे हे आगळेवेगळे प्रवासवर्णन आहे.
समाजकारण / राजकारणJerusalem | जेरूसलेम
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartकाश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे. तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय ? त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे शापित नंदनवन ठरले आहे !
समाजकारण / राजकारणKashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti) | काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'नर्मदा बचाव आंदोलन ! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं. त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा... आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन् नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान हे सारं या कथेतून उलगडत जातं. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास लढा नर्मदेचा... '
समाजकारण / राजकारणLadha Narmadecha | लढा नर्मदेचा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart' युगानुयुगे निद्रिस्त राहिलेल्या चिनी माणसाला सतत जागं ठेवण्यासाठी वारंवार क्रांतीचं धक्कातंत्र अनुसरावं लागतं... माओच्या या वचनाचा आधार घेऊन त्याच्या चिआंग चिंग या पत्नीनं आपल्या सहका-यांकरवी 1966 च्या सुमारास चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली. त्या क्रांतीच्या वावटळीत हजारो निरपराध चिनी नागरिकांचे जीवन पार उद्ध्वस्त झालं. अशाच एका अभागी, पण जिद्दीनं परिस्थितीला सामो-या जाणा-या स्त्रीचं हे थरारक आत्मकथन म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या चिनी समाजाचं एक विदारक चित्र आहे. हे आत्मकथन कोणत्याही सहृदय माणसाला मनाला घायाळ करील, इतकं प्रत्ययकारी आहे. तुरुंगाच्या खिडकीतून बाहेरच्या जगाचा वेध घेऊ पाहणा-या निएन चंग नावाच्या एका मातेची ही कथा आहे. ती जशी तिच्या हालअपेष्टांची कथा आहे, तशीच ती तिच्या हरपलेल्या मुलीचीही शोधकथा आहे. तिचं सर्वस्व हिरावून घेण्यासाठी टपून बसलेले विध्वंसक रेडगार्ड्स, त्यांना प्रोत्साहन देणारे मतलबी नेते आणि त्या नेत्यांच्या दडपशाहीला बळी पडून सग्यासोय-यांच्याच जिवावर उठणारे दीनवाणे सामान्यजन या सा-यांचे अत्यंत प्रभावी चित्र या पुस्तकात रेखाटलेले आढळते. सर्वसामान्य चिनी माणसाच्या व्यथावेदनांचा परिचय करून देणारे... ऊरबडवा आक्रोश न करतासुद्धा मरणप्राय यातनांना शब्दरूप देणारं... आणि लेखिकेच्या अनुभवांचा अस्सल प्रत्यय देणारं आगळं आत्मकथन म्हणून निएन चंगचं हे पुस्तक जगभर गाजलं आहे, ते या प्रभावी गुणवैशिष्ट्यांमुळेच !
समाजकारण / राजकारणLife And Death In Shanghay | लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत ! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे
समाजकारण / राजकारणLokamanya Te Mahatma (Part 1 Ani 2) | लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Read more
Skip to content