समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartऋग्वेदातील ऋचा रचल्या गेल्या त्या अफगाणिस्तानातील अमू नदीच्या काठी. पारश्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता हा देखील झरतुष्ट्राने इथेच लिहिला. त्यानंतर इथल्या पर्वतपहाडांच्या द-याखो-यांतून बुद्धं सरणं गच्छामि चे सुर निनादले. आज त्याच प्रदेशात अल काईदाचे वेगळ्याच प्रकारचे साहित्य सापडले आहे - सर्व त-हेची विध्वंसक कृत्ये करण्याचे पद्धतशीर शिक्षण देणारे साहित्य. मुळात हा प्रदेश होता अश्र्वगणस्थान. काळाच्या ओघात तो झाला अफगाणिस्तान. १९७९ च्या अखेरीस रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसले तेव्हा संतापलेल्या सर्वसामान्य अफगाणांनी चिडून म्हटले होते, आज आमचे अफगाणिस्तान मेले. आता आमच्या देशाचे नाव ठेवायसा हवे. शोहखीस्तान . त्यानंतर २४ वर्षांच्या युद्धामुळे पूर्णपणाने पिळवटून निघालेले, भांबावलेले, संतापलेले सर्वसामान्य अफगाण भविष्याकडे आशेने नजर लावून बसले आहेत. पण तिथे सरकार स्थिर राहू नये, शांतता नांदू नये म्हणून प्रयत्न करणा-या, आपले स्वार्थ जपणा-या अंतर्गत शक्ति आहेत, बाहेरच्या शक्तिही आहेतच. जर तिथे शांतता स्थापन झाली नाही, तर पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडणार आहे. एका बाजूला जगातील इस्लामेतर शक्ति आणि सत्तांचा विध्वंस करायला सज्ज झालेला दहशतवाद आहे; तर दुस-या बाजूला जगावर निरंकुश सत्ता गाजवायला सिद्घ झालेल्या पाश्चात्य साम्राज्यवादाचा म्होरक्या बलिष्ट अमेरिका आहे. या जात्यात आज अफगाणिस्तान भरडून निघाला आहे, तर इतर देश सुपात आहेत. इतिहासाच्या या स्तिमित करणा-या वाटचालीचा वेध घेणारे पुस्तक.
समाजकारण / राजकारणAfgan Dairy : Kal Aani Aaj | अफगाण डायरी : काल आणि आज
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartअर्थशास्त्र म्हणजे संभाव्यतेचे शास्त्र, पण दिसते मात्र अशक्य कोटीतल्या कालाकृतीसारखे'. अर्थशास्त्राची अशा प्रकारची व्याख्या भारताच्या प्रत्येक अर्थमंत्र्याला रुचेल आणि संवादी वाटेल. कारण त्याला दरवर्षीच आशेची जादुई किल्ली वापरण्याचे कौशल्य दाखवावे लागते. आणि सुप्रसिध्द भारतीय दोरीची जादू करावी लागते. म्हणजेच अंदाजपत्रक सादर करावे लागते. अंदाजपत्रकात मोठ्या कौशल्याने मिळकत आणि खर्च यांचा टोला काळजीपूर्वक साधलेला असतो. कराचे दर आणि करसवलती, विकास आणि सामाजिक न्याय सुधारणा आणि स्थितीवाद या सा-यांचाच तोल अर्थमंत्र्याला साधायचा असतो. या मर्यादेतसुध्दा अर्थमंत्री खूप काही उद्दिष्ट्ये साधू शकतात. पी. चिदंबरम हे एक नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि टीकाकार आहेत. त्यांच्या या लेखांमधून याचे सम्यक दर्शन आपल्याला घडते. या लेखांमधून त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडी सरकारच्या २००२ ते २००४ या काळातील कारकिर्दीचे मूल्यमापन केले आहे. मूळ लेख इंग्रजीमधून 'इंडियन एक्स्प्रेस' आणि 'फायनान्शियल एक्स्प्रेस' मध्ये प्रसिद्ध झालेले होते. १९९६ ते १९९८ या काळात पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते आणि २००४ पासून ते पुन्हा अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांनी केलेल्या स्तंभलेखनातून विविध प्रकारच्या व्यापक प्रश्नांवर निरुपण केले आहे. सदर लेखांमध्ये शेती (केवळ अन्नसुरक्षा म्हणून नव्हे तर रोजगाराचा प्रमुख स्त्रोत म्हणून), आर्थिक सुधारणा, अंदाजपत्रके, परकीय चलनाची गंगाजळी (काही वर्षांपूर्वी तिचा तुटवडा होता आणि आता प्रचंड साठा आहे आणि त्यातून नवे प्रश्न उभे राहत आहेत.), आर्थिक वाढ आणि करधोरण अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्यात राजकीय घडामोडींची निरीक्षणे आणि परिशीलन आहे. सामाजिक प्रश्नांवरील परखड विचार आहेत. चिदंबरम या काळातील घटनांवर निव्वळ प्रतिक्रिया देऊन थांबत नाहीत, तर त्यांच्या लेखनातून वाचकाला भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांची अतिशय स्वच्छ, नितळ अशी समज येते. त्याचप्रमाणे राजकीय प्रश्न आणि ते सोडविण्याचे मार्ग यांचाही उमज पडतो. त्यांनी हाताळलेले सर्वच प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून गेल्या काही वर्षांत जी आर्थिक वाढ झाली ती टिकविण्याच्या संदर्भातील कळीचे मुद्दे आपल्याला कळू शकतात. त्याचप्रमाणे हे लेख म्हणजे एका अर्थमंत्र्याने कुंपणाच्या पलीकडे बसलेल्या दुस-या अर्थमंत्र्याला दिलेली टिपणे आहेत, असेही त्यातून प्रतीत होते.
समाजकारण / राजकारणAlipta Drushtikonatun | अलिप्त दृष्टिकोनातून
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'll अंधश्रद्धा विनाशाय ll बोलका पत्थर लंगरचा चमत्कार मती-भानामती छोट्या मुलींची मोठी भानामती जहर उतरवणारा दुआँ करमअली दरवेशाचा पुकार मीरावली बाबाच्या दर्ग्याचा कबुलीजबाब झांशीच्या राणीचा पुनर्जन्म हरवलेला सापडला त्याची गोष्ट मरता क्या नहीं करता अनुराधा देवीची मिटलेली मूठ आणि उघडा चमत्कार निर्मला माताजींचे हिंसक अध्यात्म नवसाचे बळी की ग्रामीण अंधश्रद्धेचा गळफास ? पळ भैरवनाथाचा, शोध भुताचा जटा निर्मूलनाची कथा आणि व्यथा धडका संपवण्याची धडक मोहीम
समाजकारण / राजकारणAndhashraddha Vinashaya | अंधश्रध्दा विनाशाय
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartबोलका पत्थर लंगरचा चमत्कार मती-भानामती छोट्या मुलींची मोठी भानामती जहर उतरवणारा दुआँ करमअली दरवेशाचा पुकार मीरावली बाबाच्या दर्ग्याचा कबुलीजबाब झाशीच्या राणीचा पुनर्जन्म हरवलेला सापडला त्याची गोष्ट मरता क्या नही करता अनुराधा देवीची मिटलेली मूठ आणि उघडा चमत्कार निर्मला माताजींचे हिंसक अध्यात्म नवसाचे बळी की ग्रामीण अंधश्रद्धेचा गळफास ? पळ भैरवनाथाचा, शोध भुताचा जटा निर्मूलनाची कथा आणि व्यथा धडका संपविण्याची धडक मोहीम
समाजकारण / राजकारणAndhashraddha: Prashnachinha Ani Purnaviram | अंधश्रध्दा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषदांपासून फुले-आगरकरांपर्यंत, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन् त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध. '
समाजकारण / राजकारणApale Vichar Vishva | आपले विचारविश्व
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartकुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत. त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे. राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत तत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत अक्षर साहित्य-अभिजात कलांपासून जीनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अनेक विषयांत केतकरांना रस आहे. या विषयांवरचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले लेख म्हणजे वाचकांसाठी सकस वैचारिक मेजवानीच. माणसाचे व्यक्तिगत जीवन मानवी समूहाची समाजरचना व सांस्कृतिक वाटचाल अणुरेणूंपासून बनलेले अफाट विश्व विचार-कल्पना-भावना-वासना यांनी भारलेले अचाट मनोविश्व अशा किती तरी विषयांबद्दलचे विचार सूत्ररूपाने मांडणा-या या चिंतनिका
समाजकारण / राजकारणBadalte Vishwa | बदलते विश्व
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartसमान मानव माना स्त्रीला असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र किमान मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अँरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुध्दा आधी मानव आहोत हे सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे हे सांगणे म्हणजेच स्त्रीमुक्तिवाद. किमान तो तरी सुज्ञपणे आणि तकनिष्ठ राहून समजून घ्यावा यासाठी हा पुस्तक प्रपंच.
समाजकारण / राजकारणBaimanus | बाईमाणूस
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'इसवी सन 2020 पर्यंत किंवा जमल्यास त्याच्याही आधी प्रगत भारत उभा करणे हे हस्तिदंती मनो-यात बसून विचारलेले मिथ्या स्वप्न नव्हे किंवा केवळ आशावादही नव्हे. खरे तर, ही अथक परिश्रमांची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे. आपण सारे त्यात मनापासून सहभागी होण्याचा अवकाश... मोहीम यशस्वी झालीच म्हणून समजा ! '
समाजकारण / राजकारणBharat 2020 : Navya Sahastrakacha Bhavishyavedh | भारत २०२०: नव्या सहस्रकाचा भविष्यवेध
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Read more -
Sale! Add to cart'भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल, असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे. घटनापरिषदेत झालेल्या मान्यवर नेत्यांच्या चर्चेपासून असंख्य घटनातज्ज्ञांच्या, राजकीय नेत्यांच्या लेखनापर्यंत विविध संदर्भ देत एका अनुभवसंपन्न, तत्त्वनिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. निव्वळ टीकाटिप्पणी करण्यात समाधान न मानता राष्ट्रीय परिस्थिती सावरण्यासाठी व सुधारण्यासाठी काय काय करता येईल, याबद्दलच्या काही उपयुक्त सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या विचारप्रवर्तक पुस्तकाचे मोल खचितच वाढले आहे. सर्व विचारसरणींच्या विवेकी अनुयायांनी अवश्य वाचावे, विचारात घ्यावे, अशा लक्षणीय पुस्तकाचा तितकाच समर्थ अनुवाद.
समाजकारण / राजकारणBharatachi Dharmanirpekshata Dhokyachya Valanavar | भारताची धर्मनिरपेक्षता : धोक्याच्या वळणावर
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart
Skip to content