समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cart'गेली साठ वर्षे भारतात संसदीय लोकशाही टिकली खरी, पण ती खरोखरच पूर्णार्थाने यशस्वी झाली का ? संसदेचे होत गेलेले अवमूल्यन, सहिष्णुतेवर आधारलेल्या संसदीय प्रथांचा -हास, लोकप्रतिनिधींचा वाढत चाललेला बेजबाबदारपणा आणि भ्रष्टाचार रोखण्यात शासनयंत्रणेला पत्करावे लागणारे दारुण अपयश... काळजी वाटावी, अशीच ही वस्तुस्थिती. तिची परखड कारणमीमांसा करतानाच हे पुस्तक या परिस्थितीतून मार्ग काढण्याबद्दलच्या विधायक सूचनाही मांडते. एका माजी व्यासंगी सनदी अधिकाऱ्याने लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक विवेकी नागरिकाने आणि लोकप्रतिनिधींनीही अवश्य वाचले पाहिजे.
समाजकारण / राजकारणBharatachya Sansadiya Lokshahichi Agnipariksha | भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartसोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मन श्रद्धावादी तरी बनते किंवा बुद्धिवादी तरी बनते. बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात. म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक तो प्रचार कॉलेजमधील युवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास हवा. क्षणोक्षणी मांत्रिकाकडे, गुरूकडे अथवा देवाकडे धाव घेण्याची सवय लागली की, पुरुषार्थ निकालात निघतो, हे त्यांना समजले पाहिजे किंवा समजावून सांगितले पाहिजे. अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण श्री. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशतःच सुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपण ते काय ? ना. ग. गोरे
समाजकारण / राजकारणBhram Aani Niras | भ्रम आणि निरास
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartसर्वनाश झाल्याशिवाय नवं निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे ! आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब... बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आपण केलेला पराभव! पण तरीही बुद्ध हसतो आहे... आणि म्हणतो आहे, पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत आहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मी यावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..
समाजकारण / राजकारणBuddha Hasto Aahe | बुध्द हसतो आहे
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartकर्तबगार सत्ताधारी स्त्री दुराग्रही आणि तिच्यात दडलेली आई आंधळी झाली म्हणजे जन्माला येते, लोकशाहीचा घास घेऊ पाहाणारी आणीबाणी. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली आणि घटनाबाह्य सत्ताकेंद्र म्हणून संजय गांधींचे नेतृत्व उदयाला आले. याबद्दलची साधकबाधक चर्चा करणारी अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिध्द झाली आहेत. पण त्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणा-या बी.एन.टंडन या पंतप्रधानांच्या कार्यालयातील संयुक्त सचिवाची ही तत्कालीन दैनंदिनी त्या सर्वांपेक्षा वेगळेपणाने उठून दिसणारी आहे. प्रत्यक्ष आणीबाणी लादली जाण्यापूर्वी आठ महिने ही दैनंदिनी सुरू होते. कोणतेही भाष्य न करता घटनाक्रमच ती अशा रितीने उलगडत जाते की, त्या भीषण नाटकातील विविध पात्रे आपापल्या स्वभाववैशिष्ट्यांसह, गुणदोषांसह जिवंत होऊन आपल्यासमोर उभी राहतात. सत्तासंघर्षाचा खेळ जसजसा रंगत जातो, तसतशी राष्ट्रीय संकटाची जाणीव अधिकाधिक गहिरी होत जाते. ही दैनंदिनी म्हणजे एका जागल्या ने जनतेच्या दरबारात केलेले अप्रत्यक्ष वृत्तांतकथन आहे. लोकशाही टिकून राहावी, समृध्द व्हावी, असे वाटणा-या प्रत्येक सुजाण नागरिकाने कर्तव्यबुध्दीने वाचावे असे हे लक्षणीय पुस्तक आहे.
समाजकारण / राजकारणChahul Aanibanichi | चाहूल आणीबाणीची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartघोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारण अशी राजकारणाची सध्याची व्याख्या. राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं, कुठल्याही टोकाला आणि कोणत्याही पातळीला जायची तयारी हवी- ही सामान्य माणसाची राजकारणाबद्दलची समजूत. म्हणूनच त्याला 'राजकारण' हा प्रांत आपला वाटत नाही. पण हे सगळं थांबवायचं, बदलायचं कोणी ? कसं ? केव्हा ? सुरुवात कोठुनतरी, केव्हातरी करायची ना ? मग ते केव्हातरी आताच का नाही ? चांगली माणसं राजकारणात यावीत, त्यांनी चांगली कामगिरी करावी त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं, त्यायोगे राजकारण म्हणजे समाजाचं उन्नयन आणि प्रगती घडवणारं एक उपयुक्त साधन ठरावं यासाठी...
समाजकारण / राजकारणChala Rajkarnat | चला राजकारणात
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का ? बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का ? जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का ? आणि सर्वांत कळीची समस्या. हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का ? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : . आनंद हर्डीकर प्रा. फकरुद्दीन बेन्नूर डॉ. अलीम वकील अब्दुल कादर मुकादम श्री. मा. भावे डॉ. के. रं. शिरवाडकर . विश्वास दांडेकर डॉ. सदानंद मोरे रमेश पतंगे . दिलीप करंबेळकर डॉ. माधव गोडबोले प्रदीप रावत
समाजकारण / राजकारणCongressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? Ya Granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cart'जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असतो - माणसाचं आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नयन हेच आमचं उद्दिष्ट! मात्र आज धर्म या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, खिश्चन... हे शब्दोच्चारही परस्परांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत. कल्याणकारी रूप अपेक्षित असलेल्या धर्माशी जोडल्या गेलेल्या या भयभावनेचा उगम नेमका कुठे आहे? धर्माच्या नावाखाली चाललाय उद्विग्न करणारा उच्छाद. घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला जबाबदार ठरतोय धर्म. गलिच्छ राजकारणासाठी, सत्ताप्राप्तीसाठी, स्त्रीच्या उपभोगासाठी, दलितांच्या खच्चीकरणासाठी, दुर्बलांच्या पिळवणुकीसाठी तो बिनदिक्कतपणे वापरला जावा? आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं? धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो माणसाची? धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल, तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ. धर्म आणि हिंसा'
समाजकारण / राजकारणDharma Aani Hinsa | धर्म आणि हिंसा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartप्रसिध्द इतिहासकार ॲर्नाल्ड टॉयनबी म्हणतो, की हिंदू (भारतीय) संस्कृती ही आजच्या जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. भारतीय उपखंडाएवढया मोठया प्रदेशात, अडीच हजार वर्षांपूर्वी ती पसरली होती. अशी गोष्टही जगाच्या इतिहासात प्रथमच घडली. नद्यांची सुपीक खोरी, मोठी लोकसंख्या आणि साधनसामुग्री असलेला हा भूप्रदेश आणि शौर्याचा, ज्ञानाचा वारसा असलेली संस्कृती हे, हेवा वाटावा असे देणे आपल्याला लाभले. इतिहासाकडे मागे वळून पाहताना जे दिसते ते असे : चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी २४०० वर्षांपूर्वी ग्रीक आक्रमण परतवून या उपखंडात सीमा सुरक्षित असलेले एक सुनियंत्रित साम्राज्य निर्माण केले. टॉयनबी याला भारतातील पहिली युनिव्हर्सल स्टेट असे म्हणतो. त्यानंतर जी राजकीय, धार्मिक आक्रमणे झाली त्याला विरोध झाला तरी असे पूर्ण यश पुन: हाती लागले नाही. भारतात मोगल साम्राज्य स्थापणारा बाबर अवघ्या पंधरा हजार सैन्यानिशी आला होता. रजपुतान्याकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती निश्चित होती. इंग्रज मूठभर होते. त्यांनी मराठयांना पराभूत करून दीडशे वर्षे राज्य केले. रजपूत, जाट, विजयनगर, मराठे, शीख एकएकटे लढले आणि पराभूत झाले. अशा शक्ती योग्य वेळी एकत्र आल्या असत्या, तर भारताचा इतिहास वेगळा घडला असता. हिंदू समाजातील ज्या त्रुटींमुळे पूर्वेतिहास असा घडला, तेच दोष आजही आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत का ? हिंदू समाजाला परिवर्तनाची गरज आहे का? आणि त्या परिवर्तनाची दिशा कोणती, असे हे अस्वस्थ करणारे प्रश्न. या अस्वस्थतेचा प्रत्यय वाचकांपर्यंत पोहचावा ही 'एक अस्वस्थ हिंदू मन' या लेखनामागची भूमिका.
समाजकारण / राजकारणEk Aswastha Hindu Man | एक अस्वस्थ हिंदु मन
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartभारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे एका दिशेचा शोध
समाजकारण / राजकारणEka Dishecha Shodh | एका दिशेचा शोध
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला मूठभर समविचारी सवंगडी. परदेशातील सुस्थिर जीवन, सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला. कोण जिंकलं या लढ्यात ? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी एका निवडणुकीची गोष्ट
समाजकारण / राजकारणEka Nivadnukichi Goshta | एका निवडणूकीची गोष्ट
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
Skip to content