समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartमला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय. पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय. मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणा-या तिच्या कणखरपणाविषयी !
All BooksPunha Ekada ‘Stri-Purush’ Tulana | पुन्हा एकदा स्त्री पुरुष
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cart'जवळजवळ एक तप महाराष्ट टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना, इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद -- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा लावला नाही किंवा कोणत्याही पक्षाची पताका खांद्यावर घेतली नाही. एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी अनेक नेत्यांची व घटनांची रोमहर्षक शब्दचित्र रेखाटून तो अवघा माहोल आपल्या रसरशीत शैलीत उभा केला. राजकारणाची व दिल्लीची स्पंदनं टिपणारं हे चटकदार लेखन जणू चकित करणा-या, चकविणा-या, चक्रावून टाकणा-या दिल्लीची आधुनिक बखरच ! धावती, ओघवती नि झगमगती ! '
समाजकारण / राजकारणRajdhanitun | राजधानीतून
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartलेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असेल, तरच त्याच्या मनातले लेखनात उतरते. अलीकडील काळात शासनाबरोबरच सामाजिक असहिष्णुतेचे दडपण लेखकावर येऊ लागले आहे. समाजात निर्माण झालेली दहशतीची भावना सामान्य माणसांपेक्षाही प्रतिभावंतांना अधिक जाणवते. मग एक तर ते स्तब्ध होतात किंवा वैचारिक संघर्षाला उभे राहतात. प्रत्येक जण सॉक्रेटिस होऊन शांतपणे विषाचा प्याला पिऊ शकत नसतो. त्याला मग न लिहून शहाणे तरी व्हावे लागते, अगर आपल्या स्वातंत्र्याची बूज राखणारा, त्याचा आदर करणारा उदार समाज अस्तित्वात येईल याची वाट पाहावी लागते. राजकारणातली मंडळींना, ते जाहीरपणे काहीही बोलत असले, तरी निर्भीड नागरिकांचे, लेखकांचे स्वातंत्र्य नकोच असते. साहित्यिक आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मुख्य जबाबदारी असते आपली स्वत:ची. आपल्या विचार, लेखन आणि वाचनस्वातंत्र्याचे रक्षण जागरूकपणे आपणच करावयाचे असते. ही जागरूकता जपण्यासाठी विचार करणा-या प्रत्येक सुजाण व्यक्तीने आवर्जून वाचलेच पाहिजे, असे -
All BooksSahitya Ani Svatantrya | साहित्य आणि स्वातंत्र्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartयेशू ख्रिस्त म्हणजे सा-या जगाला दयेचा, शांतीचा संदेश देणारी करूणामूर्ती. पण त्या प्रेषिताची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणारा पॅलेस्टाइनचा प्रदेश सध्या ज्यू विरूद्ध अरब अशा संघर्षाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. त्या रक्तबंबाळ ख्रिस्तभूमीची व्यथा समजून घेण्याच्या इराद्याने वारंवार त्या प्रदेशाची यात्रा करून आलेल्या एका मानवतावादी ख्रिस्ती भाविकाची साक्षेपी निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक. विसावे शतक व्यापणा-या ज्यू-अरब संघर्षाचा ऐतिहासिक वेध घेता घेता तीन धर्मांच्या श्रद्धांशी निगडीत असणा-या त्या प्रदेशाची आगळी सफरही घडवून आणणारे हे शैलीदार पुस्तक धुमसत्या पश्चिम आशियाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी बहाल करते.
समाजकारण / राजकारणSangharshayatra Khristabhumichi | संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cart'कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज लिव्ह-इन रिलेशनशिप ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज सरोगसी द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
समाजकारण / राजकारणSati Te Sarogasi | सती ते सरोगसी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटका करणारा हा ग्रंथ... सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय ? त्यांनी हिंदुराष्ट्राचा वा तथाकथित द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे नक्की कशाचा पुरस्कार केला होता ? त्यांना अभिप्रेत असणा-या राज्यघटनेचा पाया कोणता होता धर्मग्रंथ की अद्ययावत बुद्धिप्रामाण्य ? त्या घटनेनुसार अहिंदूंना कोणकोणते हक्क मिळणार होते ? या व अशाच इतर असंख्य प्रश्नांची साधार, मूलगामी उत्तरे देणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ भारतीय राजकारणाचे धागेदोरे समजून घेऊ इच्छिणा-या सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे.
समाजकारण / राजकारणSavarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartसंघाची हिंदुत्व-संकल्पना व सावरकर-आंबेडकर यांचा समाजविचार ह्यांची जोड जमली आणि संघाच्या हिंदु संस्कृती चा आशय पूर्णपणे धर्ममुक्त झाला; तर आपल्याकडच्या राष्ट्रवादाची वैचारिक कोंडी फुटेल, अशी शक्यता आहे. ह्या प्रक्रियेला हातभार लावणे हा ह्या पुस्तकाचा विनम्र उद्देश आहे.
समाजकारण / राजकारणSawarkar Te Bha.Ja.Pa : Hindutvavicharacha Chikitsak Aalekh | सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreआपल्या सामाजिक विचाराला आणि आचाराला आपल्या समग्र कर्तृत्वाचा गाभा मानणारे सावरकर म्हणजे काही शास्त्राधार पाहून- दाखवून समाज बदलायला निघालेले समाजसुधारक नव्हते तर धर्मग्रंथावर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस संपले, अशी घोषणा करणारे बुद्धिप्रामाण्यवादी कर्ते विचारवंत होते. हिंदू समाजाला जखडून टाकणा-या सप्तबंदीच्या बेड्या आपल्या घणाघाती युक्तिवादाने खळाखळा तोडून टाकणारे ते क्रांतिकारक होते. त्यांनी रत्नागिरीत जसे पतितपावन मंदिर उभारले, तशी पूर्वास्पृश्यांना अनेक जुनी मंदिरे खुली करून देण्यासाठी यशस्वी आंदोलनेसुद्धा केली. सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भाई माधवराव बागल, सत्यवादीकार बाळासाहेब पाटील प्रभृती ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. ते क्रांतिकार्य पूर्ण करण्यासाठी आपले उरलेले आयुष्य परमेश्वराने सावरकरांना द्यावे, अशी प्रार्थना महर्षी शिंदे यांनी केली होती. सावरकरांच्या त्या समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते, याची साधार उकल करून दाखवणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे.
समाजकारण / राजकारणSawarkaranchya Samajkrantiche Antrang | सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Read more -
Sale! Add to cartराज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे तरी किती? 'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?उत्तराखंड राज्याने केलेला 'समान नागरी कायदा' काय आहे? 'वक्फ कायदा' आहे तरी काय?सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे निवाडे द्यावेत काय ? या व यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा, विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.
All BooksSecularism, Dharmaswatantrya Ani Samaan Nagari Kayda | सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartआज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते. हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे. अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे. केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल. भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.
All BooksSfoortivadi Neetishashtra | स्फूर्तिवादी नीतिशास्त्र
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart
Skip to content