Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?

Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। 

मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, 

तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो 

(आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). 

* फाळणीचे मूलकारण कोणते होते ? 

* जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी ?

 * फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची 

राहणार होती ? 

* राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता ? 

त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता ? 

* अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण 

झाले असते काय ? 

* हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते ? 

* ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला 

असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते ?

 * आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर 

भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे 

लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा 

फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप 

काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा 

मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे 

नाव का घ्यावे लागले ? 

**अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व 

फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, 

फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, 

राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ. 

ISBN: 978-81-7434-651-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१२
  • सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०२१
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • छायाचित्र मांडणी : नयन बारहाते , मनोहर दांडेकर
  • राजहंस क्रमांक : H-01-2012
M.R.P ₹ 900
Offer ₹ 810
You Save ₹ 90 (10%)

More Books By Sheshrao More | शेषराव मोरे